पोस्ट्स

सामाजिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा | प्रतिनिधी : सुहास पाटील  राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज, केमिकल्स आणि मनुष्यबळ खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जवळपास 150 टक्क्यांपर्यंत खर्च वाढलेला आहे. मात्र, शासनाच्या जाहिरात दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने किमान 150% जाहिरात दरवाढ करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, जाहिरात बिलांचे 30 दिवसांत भुगतान करावे ई-टेंडर नोटीस पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी जाहिरात वितरणात पारदर्शकता राखावी 25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्यातील पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. अकोला, नांदेड, रत्नागिरी, पनव...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य

इमेज
शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य   अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण फुंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतीमालाला हमीभाव, वीजदर सवलत, पाणीटंचाई आणि पीकविमा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाचे लक्षन वेधले आहे. फुंदे यांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या अडचणी तात्काळ सोडवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने आणि निवेदने देण्यात येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत त्यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.